ध्यासपंथातले नायक जसेच्या तसे पत्रकारितेत कदाचित आपल्याला दिसणार नाहीत. पण, अशा लोकांना समाजासमोर आणण्याचा ध्यास असलेली माणसं मात्र नक्कीच पत्रकारितेत आहेत. त्यांची वैचारिक बैठक काहीही असो, असं काम दिसलं की ते समाजसमोर यावं म्हणून ही माणसं कायम प्रोत्साहन देत असतात.
म्हणूनच, ध्यासपंथातल्या काही प्रकरणांतील नायकांची ओळख आधी मी वृत्तपत्रातून करून देऊ शकलो. लोकसत्तामध्ये प्रसिध्द झालेल्या झारापच्या प्रसाद देवधरांवरचा लेखामुळे एका आगळ्या समाजसेवेची ओळख वाचकांना झाली, तर, सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातून, मुंबईत, रस्त्यावर्चा मुलांना आपल्या घराची सावली पुन्हा मिळवून देणाया समतोल च्या विजय जाधवांची ओळख झाली...
(मजकूर वाचण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments
Post a Comment